राज्यात आजपासून पुढील ४-५ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा !

0

मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे.विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस चांगलाच बरसला आहे.हवामान खात्याने राज्यात आजपासून पुढील ४-५ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.हवामान खात्याच्या आज कोकणसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट तसेच उत्तर- मध्य महाराष्ट्र, विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बुधवारी (ता. ५ जुलै) पावसाने हिंगोली व नंदुरबार जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे.अनेक गावात चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ६ जुलै रोजी महाराष्ट्र आणि गोव्यात तर ७ जुलै रोजी गुजरातमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. ६ जुलै रोजी ओडिशात मुसळधार पावसाचे अनुमान आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्येही येत्या २-३ दिवसात मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.

राज्यातील आजचे जिल्हानिहाय अलर्ट – रेड अलर्ट : सिंधुदुर्ग

ऑरेंज अलर्ट : कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पुणे, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा.

यलो अलर्ट : धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, ठाणे, पालघर.

ग्रीन अलर्ट (कोणताही पावसाचा इशारा नाही) : सांगली, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, बीड, परभणी, हिंगोली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया या भागात येत्या काळात पाऊस जोर धरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »