Media and Agriculture : शेवटी जाळीचा पिंजरा घेऊन उडालेच पाहिजे
Media and Agriculture : शेवटी जाळीचा पिंजरा घेऊन उडालेच पाहिजे
शेतकरी आपल्या मागण्या एकत्रित येऊन मांडणार नाहीत, एकत्रित आले तरी वरील मुद्द्यांच्या आधारे त्यांना फोडता येणे शक्य आहे. एकगठ्ठा-ठोक मतदानावर परिणाम करणारा हा वर्ग नाही, हे या प्रत्येक व्यवस्थेला १०० टक्के माहिती आहे.
काल सोशिअल मीडियाच्या माध्यमातून, कृषी पत्रकार-शेतकरी संवाद या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेचा समारोप सारांश म्हणजे, हे लेखाला दिलेले शीर्षक आहे. शालेय जीवनातील हि गोष्ट.
शिकारीच्या पिंजऱ्यामध्ये चिमण्या अडकतात, त्यात एक चिमणी पंख फडकवते-नंतर सर्व चिमण्या सोबत पंख फडकवतात, परिणाम असा कि तो पिंजरा घेऊन त्या आकाशात उडतात.
निरागस अशा चिमण्यांच स्वतःच विश्व असत…शिकारीच्या पिंजऱ्यांची त्यांना कल्पना नसते. आजच्या कृषी क्षेत्राची परिस्थिती ही अशीच आहे.
राजकीय व्यवस्था असो, व्यापारी व्यवस्था असो वा शेती करत असताना जिथे आर्थिक बाबींचा संबंध येतो अशी व्यवस्था असो.ही प्रत्येक व्यवस्था या शेतकऱ्यांवर शिकारी पिंजरा टाकणेसाठी तयार असते. संघटित नसलेले शेतकरी, विविध जाती-धर्म-पक्ष-संघटना यांच्या आधारावर फोडता येतात असे ही व्यवस्था गृहीत धरून चालते.
शेतकरी आपल्या मागण्या एकत्रित येऊन मांडणार नाहीत, एकत्रित आले तरी वरील मुद्द्यांच्या आधारे त्यांना फोडता येणे शक्य आहे. एकगठ्ठा-ठोक मतदानावर परिणाम करणारा हा वर्ग नाही, हे या प्रत्येक व्यवस्थेला १०० टक्के माहिती आहे.
त्यामुळे कोणतीही व्यवस्था असो, शेतकऱ्यांना तितकेसे गृहीत धरीत नाही ही परिस्थिती आहे.
विरोधी पक्ष हा शेतकऱ्यांची बाजू घेणारा पक्ष असतो, सरकार मध्ये तो पक्ष गेला की शेतकऱ्यांचा त्यांना विसर पडतो. राजकीय व्यवस्थेला, शेतकरी समस्यांचे भांडवल करून सत्तेत यायचे असते. सत्तेत आल्यावर या समस्यांचे त्यांना देखील विसर पडतो. याला काही राजकीय नेते अपवाद असतात, पण असे अपवाद फार क्वचितच दिसतात.
खेदाची गोष्ट म्हणजे, कृषीप्रधान भारत देशामध्ये, शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडणारी एखादी वृत्तवाहिनी सुद्धा नाही. २४ तास चालणाऱ्या,न्यूज चॅनेल्स वर..२४ तास शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, रोज एक कार्यक्रम घ्यावा यासाठी १ तास पण नाही, हि किती मोठी शोकांतिका आहे. काही चॅनेल्सचे स्वागत आहे.
की जे कृषीचा एखादा कार्यक्रम किमान १० मिनिट तरी दाखवतात, पण ज्यांनी हे कार्यक्रम पाहायला हवे, असे ग्राहक-व्यवस्थेतील लोक साखरझोपेत असताना हे कार्यक्रम दाखवले जातात. प्राईम टाइममध्ये, संध्याकाळच्या वेळी कृषीसाठी जागा एकही चॅनेलवर नाही. सकाळी उठून, फक्त शेतकरीच त्या बातम्या बघत असतील तर त्याचा उपयोग काय..?
एखादी सक्सेस स्टोरी दाखवली तर तिच्यातून प्रेरणा मिळते, पण कृषीमधील समस्यांच्या बातम्यांसाठी संध्याकाळच्या ब्रेकिंग न्युज मध्ये पण काही जास्त वेळ मिळणे आवश्यक आहे. इतर देशांमध्ये कृषी संशोधन साठी जितका प्रयत्न सरकारी पातळीवर केला जातो, भारतात तो नाही हे मुद्दे पण चर्चेत आले.
संशोधन वा एखादी योजना, ती सरकारपासून ते शेतकऱ्यापर्यंत पोहचेपर्यंत त्यात किती गळती होते हे सर्वश्रुत आहे. नेहमीच एखादी वृत्तवाहिनी शेतकऱ्यांची बाजू, बातमी..कोणतेही आंदोलन वैगरे कारण नसताना त्यांच्या प्राईम टाइम मध्ये दाखवत बसेल हे शक्य नाही…! मीडिया मध्ये शेतीसाठीच्या बातमीचा प्राधान्यक्रम हा बऱ्यापैकी खाली आहे हे पण खरे आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏