सेंद्रिय शेतीचे पुढचे पाऊल..

0

सेंद्रिय शेतीचे पुढचे पाऊल..

रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती ही संकल्पनाच शेतकऱ्यांना सहजरीत्या मान्य होत नाही.
रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती ही संकल्पनाच शेतकऱ्यांना सहजरीत्या मान्य होत नाही. सेंद्रीय शेती असो किंवा नैसर्गिक शेती, या पद्धतीच्या वापराविषयी अनेक समज-गैरसमज आधीपासूनच पसरलेले. पारंपरिक शेतीच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढणे कठीण मानले गेले. पण, अलीकडच्या काळात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढू लागली आहे. शेती सुधारणांकडे शेतकरी लक्ष देऊ लागले आहेत. बायोडायनॅमिक शेती हा सेंद्रीय शेतीचा विस्तारीत भाग. ही पद्धती जुनीच. पण, भारतात अलीकडच्या काळात अधिक चांगल्या पद्धतीने विकसित होऊ लागली आहे. सेंद्रीय शेतीविषयी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचत नाही. या शेतीचा प्रयोग करणारा शेतकरी एकदा जरी अपयशी ठरला की, त्याची चर्चा झपाटय़ाने पसरते. उत्सुक शेतकऱ्यांमध्येही नैराश्य येते. मुळात शेतीशास्त्र हे भारतीयांना वर्षांनुवष्रे अनुभवातून मिळत गेले आहे. भारतीय पूर्वज ज्या पद्धतीने शेती करीत, त्याविषयी अभ्यास करून पाश्चात्य अभ्यासकांनीही त्याची स्तुती केली आहे. पण, भारतात मात्र या शेती पद्धतीला त्याज्य ठरवले गेले. रासायनिक खते, कीड व रोगनाशके, तणनाशके यांच्या वापराकडे अधिक लक्ष दिले गेले. हेक्टरी उत्पादकता वाढल्याचे पाहून बहुतांश शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे कल दर्शवला. पण, आता त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.
रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अर्निबध वापरामुळे मृदा आरोग्य बिघडले आहे. पिकांसाठी आवश्यक सूक्ष्म जिवाणू नष्ट होत चालले आहेत. उत्पादकतेवरही परिणाम होऊ लागला आहे. रासायनिक खतांमधून पिकांची भूक भागते का?, कीडरोग नियंत्रणाचे सोपे उपाय कोणते आहेत? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडतात. आर्थिक नुकसान होईल, हे गृहित धरून विषारी औषधाची फवारणी केल्याने मित्र कीड, मित्र बुरशी मोठय़ा प्रमाणावर नष्ट होते आणि निसर्गाचे संतुलन बिघडते, हे शेतकऱ्यांना समजावून सांगून त्यासाठी नेमके काय करावे याचे मार्गदर्शक प्रात्यक्षिकासह व्यापक स्वरूपात करणे आवश्यक होते. पण, या मार्गदर्शनाअभावी शेतीचे नुकसानच झाले.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »