बळिराजाचं टेंशन वाढलं! अवकाळी येऊन गेला पण कहर करून गेला, ‘ते’ पीक कसंबसं वाचवलं पण…

0

बळिराजाचं टेंशन वाढलं! अवकाळी येऊन गेला पण कहर करून गेला, ‘ते’ पीक कसंबसं वाचवलं पण…

किरण बाळासाहेब ताजणे, 
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हा प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखला जातो. मात्र, कांदा उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी मोठ्या संकटात सापडला आहे.

नाशिक : कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख जगभरात आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. मात्र यंदाच्या वर्षी लाल कांदा आणि उन्हाळ कांदा ही दोन्ही पिके अवकाळी पावसामुळे खराब झाली आहे. त्यात काही शेतकऱ्यांनी कसाबसा कांदा वाचवला मात्र आता तो कांदा साठवला तरी खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. शेतात कांदा असताना त्याला काही प्रमाणात पावसाची पाणी लागले होते आणि त्यामुळे हा कांदा खराब होऊ लागला आहे. खरं तर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा केल्यानंतर तो साठवण करण्यासाठी चाळी निर्माण केल्या आहेत. चाळीत कांदा साठवला तर तो अधिक काळ टिकतो मात्र, यंदाच्या वर्षी मोठा फटका बसू लागला आहे. साठवण करून काही दिवस होत नाही तोच कांदा खराब होत असल्याचे लक्षात येऊ लागले आहे.

यंदाच्या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवण करून त्याचे पैसे होतील की नाही याबाबत शंका आहे. अवकाळी पावसाने कांदा अक्षरशः भिजून शेतातच सडून गेला आहे. काही शेतकऱ्यांनी तो कांदा कसाबसा वाचवला असला तरी तो साठवण करूनही टिकत नसल्याचे समोर आले आहे.
एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे वाढलेला तापमानाचा पारा बघता कांदा चाळीमध्ये टिकत नसल्याचं साठवण करतानाच लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी महत्वाचा असणारा उन्हाळ कांदा खराब होऊ लागला आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »