अमावस्या व बोड अळी संबंध

1

अमावस्या व बोड अळी संबंध
शेतकरी बंधुनो,🙏🙏

  {*Note:
 हि पोस्ट मी माझ्या अनुभवावर आधारित लिहिली आहे, याच्याशी काही लोक सहमत असतीलच असे नाही
}

मित्रानो,
आपल्या शेतात बीटी कापसाच्या शेतात बोन्ड अळीने मोठ्या प्रमाणात  थैमान घातले आहे, असा बाऊ केला जातआहे.चांगले निरीक्षण केल्यास असे दिसून येईल की ,जी नॉन बीटी ची कापसाची झाडे तुमच्या शेतात आहेत त्यावरच अळी आहे बीटीच्या झाडावरहि आहे पण बीटीच्या झाडात अळी प्रतिबंधक जीन्स असल्यामुळे पान,  फुल झाडाचे काहीही तिने खाल्ले तरी ती मरेल ,कारण 85/90 दिवसापर्यंत बीटीचे जीन्स प्रतिकार क्षम असतात.पण जी नॉन बीटीचे झाड शेतात आहेत त्यावरची अळी मरणार नाही, आणि अशा नॉन बीटीच्या झाडात अळी प्रतिबंधक जीन्स नसल्यामुळं त्या कापसाच्या झाडावर ऑक्टोबर एन्ड पर्यन्त अळी पडतच राहणार आहे. कारण बऱ्याच कंपन्यांनी 25 ग्रॅम नॉन बीटी बियाणे 450 ग्राम बियाण्यातच मिक्स करून दिलेले आहे, आणि ती झाडं आपल्या शेतात विखुरलेल्या स्वरूपात आहेत, शेतात चांगले निरीक्षण करा,तुम्हीच मला सांगाल सर तुम्ही म्हणतात ते खरे आहे.

{*Note:
 हि पोस्ट मी माझ्या अनुभवावर आधारित लिहिली आहे, याच्याशी काही लोक सहमत असतीलच असे नाही
}

दुसरी एक महत्वाची गोस्ट किटकनाशके विकणाऱ्या कंपन्या,त्यांचे प्रतिनिधी, अप्रामानिक व्यावसायिक यांनी अफवा पसरवल्या मुळे शेतकरी नागवला जात आहे.लूट चालू आहे.

मित्रानो मी 2/3 तारखेला एक पोस्ट टाकली होती आणि त्यात स्पस्ट म्हटले होते की 4/5 दिवसात शेतात अळीच दिसणार नाही, आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी मला तसे कळवलेही व जी अळी दिसली ती नॉन बीटी वरच दिसली. आणि आज तर अळीच दीसत नाही.माझे एक दोन नाही तर 50/60 शेतकऱ्यांनी 60/70 दिवसाचा कापूस झाला तरी फवारणीच केली नाही, हे मी वेळोवेळी ग्रुपवर तुम्हाला सांगितले आहे, असो आता आपण अळी च्या संदर्भात पाहू.

बोन्ड अळीच्या नियंत्रणासाठी  कामगंध सापळे

गुलाबी बोन्डअळीचे पतंग जे एक पतंग किमान अंदाजे १८० ते २०० अंडी घालते. त्याचे नियंत्रण करण्यासाठी किंवा त्याचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे. हे जाणुन घेण्यासाठी कामगंध सापळे कपाशीच्या झाडाच्या दीड ते दोन फुट उंचीवर एकरी 5 ते 6 , शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावावे.पण कामगंध सापल्यामुळे सेंद्री अळी नियंत्रित होईल असे नाही .हे पतंग पाऊस पडल्यावर कोषातून बाहेर येतात व त्यांचे आयूर्मान 2 महिने असते, त्या 2 महिन्याच्या वेळेत ज्या अमावश्या येतात त्या त्या वेळी ते अंडी घालतात.

 आपण कापूस लागवड केल्यानंतर मशागत करतो व जमिनीत गाडल्या गेलेले कोष पुन्हा बाहेर येतात, व ते पुढे 2 महिने , असे चक्र चालूच राहते, हे पतंग 1 ते दीड किलोमीटर पर्यन्त उडू शकतात, आणि कापसाचे जे पीक लुसलुशीत दिसते त्यावर अंडी घालतात.

     गेल्या 20/25 दिवसापासून बऱ्याच शेतकऱयांनी कामगंध सापळे लावून ठेवलेले आहेत, पण आता त्यांची अशी तक्रार आहे की एकही नर कामगंध सापळ्यात अडकला नाही, बरोबर आहे , कारण यावर्षी 22 जूनला पाऊस पडून पेरण्या झाल्या ,व आयुर्माणाच्या हिशोबाने ते पतंग मरून गेले काहींना पक्षांनी खाल्ले, 22 जून ते 1 ऑगस्ट या काळात जंगलात  खायला काहीच नव्हते ,पक्षांनी खाल्ल्यामुळे  पतंगाची संख्या कमी झाली ,शेतकऱ्यांनी फवारे मारले  त्यातही ते नाहीसे झाले मग तुमच्या कामगंध सापळ्यात पटांगच नाहीत तर ,कोठून पतंग येतील?

    मित्रानो येणाऱ्या अमावस्ये नंतर येणारा अळीचा अटॅक सौम्य असणार आहे घाबरून जाऊ नका. काही बंधू कापूस उपटून फेकत आहेत, इतका धीर सोडू नका योग्य ती उपाय योजना करा ,तद्न्य व्यक्तीचा सल्ला घ्या, मार्ग निश्चितच निघेल.

   दोन गोष्टी करा, मार्ग निघेल

(1)
कापुस पिकाला युरिया हे खत जास्त टाकु नका युरियामुळे पीक लुसलुशीत होते,म्हणजे एक प्रकारे ते माजावर येते, आणि जास्त प्रमाणात रोग ,किळ,अळी पिकावर पडतात.
(२)  मोनोक्रोटोफास ,असिफेट,सारखे औषधी फवारणी करू नये

मोनोक्रोटोफॉस ,असीफेट यांची कापूस पिकावर फवारणी केल्यामुळे झाडांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते व रोगाला लवकर बळी पडतात ,तसेच लुसलुसीत कापसावर गुलाबी बोंड अळीचा पतंग लवकर आकर्षित होतो.
कापुस फुल अवस्थेमधें आल्यानंतर म्हणजेच 55 ते 60 दिवसाचा झाल्यावर योग्य ती व योग्य प्रमाणात फवारणी करावी  चांगल्या प्रकारे गुलाबी अळीवर नियंत्रण मिळेल.

  अमावश्या आणि अळी

मित्रानो, कापूस या पिकावर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो, आणि तो म्हणजे अमावश्या  सर्व सजीव श्रुष्टीचा मीलन आणि फलन काळ हा अमावस्या असतो, प्रत्येक महिन्याच्या अमावाश्येला एक दोन दिवस मागे पुढे, म्हणजे महिन्याच्या ज्या 4/5 काळ्याकुट्ट रात्री असतात, त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात, हि अंडी पिकांच्या लुसलुशीत पानावर ,पातीच्या देठावर घालतात, हि अंडी साधारणतः 48 ते 72 तासात उबवतात
 {ते तापमानावर अवलंबुन असते, तापमान कमी असेल ,तर 4 दिवसात हि उबवतात}   
 त्यातून अतिशय सूक्ष्म अळी जन्माला येते ती साध्या  डोळ्यांनी दिसत नाही इतकी सूक्ष्म असते, ती प्रथम फुलात जाते व एक दोन दिवसांनी फुलांच्या पाकळ्या आतून वाळतात फुलांचा रंग फिकट जांभळट होतो , तीच डोमकली तयार होते. 2/4 दिवसात हि अळी फुलांच्या आत असलेल्या लहान कैरीच्या आत जाते, कैरीच्या आत गेल्यावर तिची संपूर्ण अवस्था तेथेच पूर्ण होते, अली ज्या मार्गाने कैरी गेलेली असते तो मार्ग कैरीच्या वाढीमुळे बंद होतो व आपल्याला माहिती पडत नाही की कैरीत अळी आहे ते.आणि म्हणूनच या अळी ला कोणतेही किळनाशक मारू शकत नाही, तुम्ही ती कैरी रात्रभर किळनाशकात बुडवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी फोडून पहिली तरी ,ती  जीवन्त सापडेल. या सेंद्री अळीचे आयुर्मान 35 दिवसाचे असू शकते.

      मित्रानो आपण ह्या अळीला मारू शकत नाही, हिच्यावर नियंत्रण करायचे असेल तर , अमावस्येच्या 2 दिवसांनी  अंडीनाशक फवारणी करणे, किंवा ती अति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारून.

     सेंद्रीवर अळी वर उपाय

     अळी कैरीत गेल्यामुळे आपण तिला मारू शकत नाही, आपल्या हातात फक्त अंडी नासवणे आणि प्राथमिक अवस्तेतील अळी मारणे हेच उपाय शिल्लक राहतात.अमावस्ये नंतर चे 4 दिवस त्यासाठी महत्वाचे असतात, आणि या 4 दिवसात जर आपण योग्य ती आणि योग्य प्रमाणात किळनाशक फवारणी केली तर 80 ते 90% सेंद्री अळी चे नियंत्रण करू शकतो.

     उपाय

अमावस्येच्या 2 दिवसांनी खालील फवारणी करावी.प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी आहे.

{1} थोयोडीकार्ब 20 ग्रॅम ,नीम अर्क 20% 30 मिली ,स्प्रे + 2 मिली, प्रोफेनोफॉस 30 मिली.

{2} इमामेकटींन बेंझोइत 8 ग्रॅम, DDVP 30 मिली, निमार्क 20% 30 मिली,स्प्रे + 2 मिली.

{3} प्रोफेनोफॉस 35 मिली, deltamethrin 20 मिली , नीम अर्क 20 % 30 मिली, स्प्रे + 2 मिली.
     
वरील प्रमाणे अमावस्ये नंतर 1 फवारा मारल्यावर 5 ते 7 दिवसांनी.

    {1} थोयोडी कार्ब 30 ग्रॅम, क्लोरो 50% 35 मिली, नीम अस्त्र 20% 30 मिली ,स्प्रे + 2 मिली.

{2} डेल्टा मेथ्रीन 20 मिली , DDVP 30 मिली,  नीम अर्क 20% 30 मिली, स्प्रे + 2 मिली

{3} डायपेल 50 ते 60 मिली,  नाराणास्त्र  10 मिली,निमास्त्रा 20% 30 मिली, स्प्रे + 2 मिली.

टीप कोणत्याही परिस्थितीत प्रोफेनोफॉस, क्लोरोपायरीफॉस, लगातार 2 वेळा फवारू नका त्यामुळे कापूस पिकाची पानगळ होते.हा माझा अनुभव आहे.
   
     वरील फवारणीचा परिणाम

प्रोफेनोफॉस अळी व अंडी नाशक असल्यामुळे प्राथमिक अवस्तेतील अळी मरेल अंडी नासल्यामुळे अळी अंड्यातून बाहेर येणार नाही.नीम अर्कात ऍझोडीरेकटींन हा घटक अंडी नाशक आहे, अंडी नासतील , नीम अर्काचा तीव्र कडू वासा मूळे पतंग अंडी आपल्या शेतात घालणार नाहीत ,भुकेने व्याकुळ होऊन अली मरेल. स्प्रे + हे अत्यन्त पॉवर फुल पेनेट्रेट होणारे सिलिकॉन स्प्रेडर आहे , पानावर 1 थेंब जरी किलनाशक पडले तरी ते संपूर्ण पानात भिनले जाईल, इमामेकटींन, थोयोडी कर्ब, deltamethrin, हे जहाल विष आहे अळीचा खात्मा होईल.
  सिन्थेटिक पायरेथ्रीड औषधाचा, वापर केल्यामुळे पिकाला शॉक बसतो, तसेच चिकटा पडू शकतो, व पांढऱ्या माशीचे प्रमाण वाढू शकते.ती मारल्यानंतर एखादे टॉनिक ची फवारणी आवस्यक असते.

     आमावस्ये नंतर हे 2 फवारे मारल्या नंतर 15/20 दिवस फवारणी करावी लागणार नाही, पण तो पर्यंत पुढची आमावस्या येईल, मग पुन्हा वरील प्रमाणेच करावे लागेल.

   ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या दोन्ही आमावस्या सांभाळा ,कापसाचे उत्पन्न चांगले येईल हे खात्रीने सांगतो.   धन्यवाद

1 thought on “अमावस्या व बोड अळी संबंध

  1. आपण दिलेली माहिती पूर्णपणे योग्य आहे. परंतु शेतकरी निसर्ग चक्र पाहत नाहीत त्यानी biodynamic farming अभ्यासली की अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.पण शेतकरी अभ्यास करणे ऐवजी कीटकनाशक दुकानदार याकडे डॉक्टर म्हणून पाहतात.देश स्वतंत्र होणे पूर्वी किती कृषी रसायने वापरात होती तरी उत्पन्न योग्य होते.आज श्रीमंत होणेच स्वप्न शेतकऱ्यास दाखवून शेतकरी त्या घटकांचा वापर करतात उत्पन्न योग्य मिळत नाही.मग कर्ज फेडता येत नाही.मग पुढचा प्रवास सुरू झाला जो शेतकरी करतो. यासाठी स्त्रियांना organic farming , कीटकनाशके ई औषध वापर याचे ज्ञान दिले तर शेतीमधील ५०/६०% प्रश्न सुटतील कारण स्त्री जादा खर्च होऊ देत नाही काटेखोर नियंत्रण ठेवेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »