पीक नुकसान भरपाईसाठी ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होणार…
![](https://krushinews.com/wp-content/uploads/2024/03/image_editor_output_image-1612948198-17109444996716331763786265059522.jpg)
बुलढाणा : फळबागांना पाऊस व गारपिटीमुळे मोठा फटका बसला होता.त्यासाठी शासनाने मदत जाहीर केली. तालुक्यातील ४७ हजार १५ हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ६४ हजार ५६३ शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाची मदत मिळणार आहे. परंतु या अनुदानासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे आवश्यक आहे. आपले सरकार केंद्रावर शेतकरी ई-केवायसी करीत असल्याचे दिसून येत आहे.सुमारे ६४ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा होईल. शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी अन्यथा अनुदान मिळणार नाही, असे आवाहन महसूल विभागाने केले होते. सध्या महा-ई-सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळत आहे.
मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना ६८ कोटी २९ लाखांची मदत वितरित होणार आहे. ६४ हजार ५६३ शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. मात्र, यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी न केल्यास अनुदान मिळणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने संयुक्तपणे पिकांचे पंचनामे केले होते.
२६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपीट झाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले होते. यात तालुक्यातील सिंदखेडराजा, किनगावराजा, दुसरबीड, सोनोशी येथे मोठे तर मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा या महसूल मंडलांमध्ये काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते.
![](https://krushinews.com/wp-content/uploads/2024/03/image_editor_output_image-1612948198-17109444996716331763786265059522.jpg)
Source : Agrowon