नत्र/युरिया केव्हा द्यावे

1

 नत्र/युरिया केव्हा द्यावे



नत्र युक्त खते हि पिकाच्या वाढीच्या काळात द्यावीत, पिक लागवडी पुर्वी देवु नयेत.

नत्र युक्त खते वापरण्यापुर्वी जमिनीत सेंद्रिय पदार्थ जी पुर्ण पणे कुजलेली असतिल केवळ तीच, योग्य प्रमाणात असावीत.

ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, मात्र जमिन भारी आहे, अशा जमिनीत युरिया किंवा अमोनियम सल्फेट कशाचा ही वापर हा फायदेशिर ठरतो.

मात्र ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, तसेच जमिन हलकी आहे अशा जमिनीत युरिया किंवा अमोनियम सल्फेट चा वापर हा जास्तीत जास्त वेळेस विभागुन असा करवा. हि खते सेंद्रिय पदार्थांसोबत एकत्र करुनच द्यावीत.

ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, अशा जमिनीत अमोनियम सल्फेट चा वापर हा सामु कमी करणे आणि व्होलाटायझेशन कमी करणे यासाठी देखिल फायदेशिर ठरतो. कारण अमोनिमय सल्फेट हे कोणत्याही परिस्थितीत 10 ते 14 टक्के ईतकेच व्होलाटायझेशन होते तर युरिया चे व्होलाटायझेशन हे 20 ते 30 टक्के इतके असते.

जर ह्युमिक अँसिड चा वापर होणार असेल तर त्यात युरिया विरघळवुन त्याचा वापर करावा. कारण ह्युमिक अँसिड ची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी ही फार जास्त असते,ज्यामुळे व्होलाटायझेशन तसेच जमिनीतल सामु वाढणे व कॅल्शियम कार्बोनेट तयार होणे, यास काही प्रमाणात प्रतिंबध घालता येईल.

स्लरी चा वापर होणार असेल तर त्यात नत्र युक्त खतांचा वापर करुन नये, कारण अशा परिस्थितीत ज्यावेळेस स्लरी ही 7-8 दिवस कुजत राहते त्यावेळेस व्होलाटायझेशन हे वेगाने होते. स्लरी मधे सेंद्रिय स्वरुपातील नत्र हे नैसर्गिक रित्या जास्त असते, त्यामुळे त्यात वरुन नत्र युक्त खते देवुन फायदा नाही.

ज्या जमिनीत अर्धवट कुजलेले किंवा न कुजलेले सेंद्रिय पदार्थ असतात अशा जमिनीत व्होलाटायझेशन चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जमिनीच्या थरात केव्हाही अर्धवट कुजलेले पदार्थ गाडु नयेत विशेष करुन तेव्हा जेव्हा शेतात पिक असते, अशा पदार्थांची कुजण्याची क्रिया ही पुर्ण झालेली असल्यानंतरच त्यांचा वापर शेतात करावा.

नत्र युक्त खते हि जमिनीत काही अंतरावर खोलवर गाडुन अशा प्रकारेच द्यावीत.
धन्यवाद.

नायट्रोजन(युरिया)

नायट्रोजन हा हवेतील मुख्य घटक आहे. तो निसर्गात मोठ्या प्रमाणावर मुक्त स्थितीत आढळतो. नायट्रोजन हा रंगहीन वायू असून त्याला वास व चव नसते. तो विषारी नाही. तो पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो. नायट्रोजन वायू विषारी नसला तरी अधिक दाबाखाली, माणसाच्या शरीरात गेल्यास वेड्यासारख हसू लागतो. व त्यांच्या १०% वातावरणीय दाबाने बेशुध्दी आणि मृत्यू संभोवतो.

विजा चमकत असताना, वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजीन यांचा संयोग होऊन नायट्नीक ऑक्साईड ( छज २ ) तयार होतो. नायट्रोजन डायऑक्साईड पावसाच्या पाण्यात विरघळून नायट्न्स ऑक्साइड ि कछज३ र्े आणि नायट्नीक अॅसिड तयार होतात. ती अत्यंत विरल स्वरूपात पावसाबरोबर जमिनीवर आणली जातात. त्यांची जमिनीवर आम्ल धर्मी पदार्थांशी अभिक्रीया होते आणि शेवटी नायट्रेट क्षार तयार होतात. त्याचा वनस्पतींच्या वाढीसाठी उपयोग होतो. वनस्पतिज अन्नातून प्राण्यांना नायट्रोजन मिळतो.

स्थिरीकरण झालेल्या नायट्रोजन, संयुगांच्या विघटनामुळे पुन्हा हवेत सोडला जातो. हे कार्य विनायट्नीकरण जिवाणू घडवून आणतात. जमिनीतील नायट्रोजन युक्त पदा यांचे हे जिवाणू विघटन करतात आणि मुक्त नायट्रोजन हवेत मिसळला जातो. तसेच लाकूड, वनस्पती व प्राण्यांचे अवशेष हवेत जळले असता त्यातील नायट्रोजन मुक्त होऊन हवेत मिसळतो. अशा प्रकारे निसर्गामध्ये नायट्रोजनचे चक्र अव्याहत चालू असते.
निमकोटेड युरियाचा वापर फायदेशीर

साध्या युरिया पिकांना उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी असून, त्यावर निमकोटेड युरियाचा वापर फायदेशीर राहू शकतो.

पिकांच्या संतुलित वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये प्रामुख्याने आवश्यक असतात. त्यातही पिकाच्या सुरवातीपासून वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये नत्राचा वापर अधिक प्रमाणात होतो. या अन्नद्रव्यांमुळे पीक हिरवेगार आणि तजेलदार दिसत असल्याने शेतकरी याचा वापर अनेकवेळा अंसुतलित व गरजेपेक्षा अधिक करत असल्याचे आढळले आहे. परिणामी पिकांची वाढ समतोल होत नाही. पिकांची वाढ खुंटते. जमिनीचे आरोग्य बिघडते. त्याचा दुष्परिणाम पिकांच्या उत्पादनावरही होतो.

युरिया वापरल्यानंतर होणारी प्रक्रिया

युरिया जमिनीत मिसळल्यानंतर त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो त्वरित विरघळतो. त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तत्काळ सुरू होते. मात्र, पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास होणाऱ्या निचऱ्यासोबत जमिनीत खोलवर जातो किंवा प्रवाहासोबत वाहून जातो. परिणामी भूजल किंवा परिसरातील स्रोत प्रदूषित होतात. जमिनीवर विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनशी संपर्क झाल्यानंतर त्यातून नायट्रस ऑक्साइड तयार होऊन हवेत निघून जातो. यामुळे वातावरणामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले. नत्र या घटकाचा ऱ्हास होऊन, पिकासाठी त्याची उपलब्धता कमी होते. जमिनीतून दिलेल्या एकूण युरियापैकी केवळ ३० ते ४० टक्केच नत्र पिकांना उपलब्ध होते. उर्वरित नत्र हवेत किंवा पाण्यामध्ये मिसळून वाया जाते. यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे.

निम कोटेड युरिया ठरतो उपयुक्त

युरियाची विरघळण्याची क्रिया मंद करण्यासाठी त्यावर कडूनिंब तेल किंवा द्रावणाचा थर दिला जातो. या द्रावणामध्ये युरिया वापरण्याचे प्रमाण साधारणपणे ०.१:१०० असे असते.
युरियाच्या दाण्यावर कडूनिंब द्रावणाच्या आवरणामुळे विरघळण्याच्या वेग आटोक्यात किंवा मंदावतो. परिणामी नत्र एकदम उपलब्ध न होता हळूहळू पिकांना मिळत राहते.
युरियाचे विघटन होऊन त्याचे नायट्रेटमध्ये रूपांतराचे प्रमाण कमी होते. हवेतील प्रदूषण टळते.
विशिष्ट अशा कडवट वासामुळे कीटक पिकाजवळ येत नाहीत. पिकाचे किटकांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
भात शेतीमध्ये निमकोटेड युरियाचा वापर केल्यामुळे नीलगाय शेतापासून दूर राहत असल्याचा अनुभव आहे.
हवेतील आर्द्रता शोषल्यामुळे साध्या युरियाचे काही दिवसांनंतर गोळे तयार होऊ लागतात. शेतात वापर करण्यात अडथळे येतात. निमकोटेड युरियामध्ये गोळे होण्याचे प्रमाण कमी आहे.
साध्या युरियाची नत्र वापर क्षमता १० ते १५ टक्के असते, तर निमकोटेड युरियाची वापर क्षमता ४० ते ४५ टक्के असते. परिणामी निमकोटेड युरियाच्या वापरामुळे उत्पादनात ५ ते १० टक्केपर्यंत वाढ दिसून आलेली आहे.
अशाप्रकारे शेतीमध्ये निमकोटेड युरियाचा वापरामुळे जमीन, हवा आणि पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होते. पीक उत्पादन खर्चही कमी होतो. यासाठी केंद्र शासनाने मे २०१५ पासून देशात उत्पादित होणारा युरिया व डिसेंबर २०१५ पासून आयात केलेला युरिया निम कोटिंग करूनच पुरवठा व विक्री करणे बंधनकारक केले आहे.

सौजन्य:इफको इ. ली.

युरिया चे दाणे पाहुन गोंधळून जाऊ नका, मोठे दाणे (ग्रॅन्युल्स) पिकासाठी फायद्याचेच

आजच्या नकारात्मक आणि विरोधी सुरा मुळे काही चांगल्या गोष्टीं समोर ही प्रश्न चिन्ह लागतांना दिसत आहे. त्याचाच एक प्रत्येय आला आहे मध्य प्रदेश मधिल निमच, मन्दसौर, रतलाम येथे. या जिल्ह्यातील शेतकर्यांच्या द्वारे काही दिवसा पासुन छोट्या दान्यांच्या यूरियाची मांगनी जोर धरत आहे. परंतु भारत सरकार द्वारे शेतीसाठी लाभप्रद वैज्ञानिकां द्वारा प्रमाणित मोठ्या दान्यांचा नीम कोटेड यूरिया विदेशातुन मागवून उपलब्ध केला जात आहे.

शासना ने शेतकर्यांना विनंती करीत म्हटले आहे कि दोन्ही प्रकार चा यूरिया ४६% नत्र देतो.

काय आहे यूरिया चा फाॅर्मूला?

युरिया चार प्रकार च्या वायुंना एकत्र करून बनवला जातो. यूरिया चा रासायनिक फार्मूला “एन.एच.2 सी.ओ.एन.एच.2” (NH2CONH2)आहे. प्रथम N(नाईट्रोजन), H(हाईड्रोजन), C-(कार्बन) व O-(ऑक्सीजन) गैस. या प्रकारे या चार गॅस ला मिळवुन यूरिया बनवला जातो. या चार प्रकार च्या वायूं मध्ये नाइट्रोजन हवेतून व बाकी तीन प्राकृतिक गॅस पासून घेऊन, निश्चित मात्रेत मिळवून यूरिया बनवले जातो.
ज्याप्रकारे वायू ला मुट्ठीत बांधून ठेवल्या जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे यूरिया मधिल उपलब्ध वायुंना जमिनीत टाकल्यावर पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर कुणी बांधुन ठेवू शकत नाही. तेव्हा जो यूरिया शीघ्र विरघळेल तो तितक्याच लवकर हवा व पान्यात विरघळून नष्ट होवुन जाईल.

मोठ्या दान्यांचा यूरिया देतो २०% अधिक नाइट्रोजन

वैज्ञानिकां द्वारे अशा यूरिया पासुन नत्र (नायट्रोजन) हळूहळू पाण्यात विरघळून झाडांना मिळेल व ज्यास्त वेळे पर्यंत मिळेल अशी योजना केली आहे. याकरिता मोठ्या दान्यांचा यूरिया बनवायचा शोध वैज्ञानिकांनी लावला आहे. वैज्ञानिकांचे द्वारा पुर्ण देशात केलेल्या सर्वेक्षणा नुसार हा निष्कर्ष काढला आहे कि मोठ्या दान्यांचा यूरिया छोट्या दान्यांच्या युरिया पेक्षा २०% ज्यास्त नाईट्रोजन पिकांना प्राप्त करून देतो. करिता मोठ्या दान्यांचा यूरिया ओलीत पिकासाठी अधिकच लाभप्रद आहे.
युरिया आणि सल्फर- एक जादुई रसायन
शेतकरी बंधूंनो गेल्या कित्येक दिवसापासून रासायनिक खतांचा अतिरिक्त भडिमार करून आपण आपल्या कसदार जमिनी जवळपास नापिकी करून ठेवल्यात. आज जमिनीचा ph वाढलाय,पाण्याचा ph वाढलाय.
यामुळे दिलेले खते पिकांना लागू होत नाहीये,जवळपास सर्वसाधारण 50% खते आणि त्यावरील खर्च वाया जात आहे.
जमिनीची क्षारता वाढत आहे,कडक जमिनी तयार होत आहे,पीक आणि उत्पादन खर्चाच्या माँनाने येत नाहीये.
मग यावर उपाय म्हणजे जमीनचा ph कमी करणे,क्षारता कमी करणे,जमीन भुसभुशीत ठेवणे ,यासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने उपाय करताना कोणी सलफुरीक,फॉस्फोरीक चा वापर करत आहे,कोणी विविध प्रकारच्या सोईल कंडिशनरचा वापर करत आहे,कोणी सेंद्रिय उत्पादने आणून टाकत आहे,कोणी बॅक्टरीया वाढवत आहे,पाण्याचं नियोजन करून वाफसा आणत आहे
असे एक ना अनेक प्रकारचे उपाय करत असताना एक अतिशय सहज सोपा आणि गुणकारी हितकारी उपाय म्हणजे युरिया आणि सल्फरएकत्र वापर करणे होय
काय होते यामुळें???
युरिया एकरी 3 किलो आणि सल्फर 3 किलो एकत्र केल्याने त्याचे रूपांतर युरेट ऑफ सल्फरह्या मध्ये होते आणि हा द्रव्य जमिनीत अनेक प्रकारचे काम करायला लागतो .
1) जमीन साफ करणे-जमिनीतील अतिरिक्त क्षार,नको असलेले घटक यांना साफ करण्याचे काम होतें
2)मुळीला नवीन चाल किंवा गती मिळते,मुळी अक्टिव्ह होतें
3) अन्नद्रव्य उचलायला मदत मिळते
4)बॅक्टरीया किवा सेंद्रिय वस्तुंना अडथळा होत नाही
5)युरिया मध्ये नत्र असले तरी सल्फर सोबत एकत्रित आल्याने अतिरिक्त नत्र वाढत नाही
6)नत्राचा वापर किंवा गरज ही पाहिल्यापासून तर शेवटपर्यंत लागते पिकाला ती गरजही थोडयाफार प्रमाणात भागते
7)जमिनीचा ph कॉन्ट्रोल राहतो,तापमान व्यवस्थित राहते
8) मुळी कायम सशक्त ,जोमदार राहुन वनस्पती शेवटपर्यंत ताण विरहित राहते
9)उत्पनात वाढ होते,उत्पादनाची गुणवत्ता सुधारते
10)सलफुरीक ऍसिड ला उत्तम पर्याय
11)dalimयुरिया आणि सल्फर- एक जादुई रसायन
शेतकरी बंधूंनो गेल्या कित्येक दिवसापासून रासायनिक खतांचा अतिरिक्त भडिमार करून आपण आपल्या कसदार जमिनी जवळपास नापिकी करून ठेवल्यात. आज जमिनीचा ph वाढलाय,पाण्याचा ph वाढलाय.
यामुळे दिलेले खते पिकांना लागू होत नाहीये,जवळपास सर्वसाधारण 50% खते आणि त्यावरील खर्च वाया जात आहे.
जमिनीची क्षारता वाढत आहे,कडक जमिनी तयार होत आहे,पीक आणि उत्पादन खर्चाच्या माँनाने येत नाहीये.
मग यावर उपाय म्हणजे जमीनचा ph कमी करणे,क्षारता कमी करणे,जमीन भुसभुशीत ठेवणे ,यासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने उपाय करताना कोणी सलफुरीक,फॉस्फोरीक चा वापर करत आहे,कोणी विविध प्रकारच्या सोईल कंडिशनरचा वापर करत आहे,कोणी सेंद्रिय उत्पादने आणून टाकत आहे,कोणी बॅक्टरीया वाढवत आहे,पाण्याचं नियोजन करून वाफसा आणत आहे
असे एक ना अनेक प्रकारचे उपाय करत असताना एक अतिशय सहज सोपा आणि गुणकारी हितकारी उपाय म्हणजे युरिया आणि सल्फरएकत्र वापर करणे होय
काय होते यामुळें???
युरिया एकरी 3 किलो आणि सल्फर 3 किलो एकत्र केल्याने त्याचे रूपांतर युरेट ऑफ सल्फरह्या मध्ये होते आणि हा द्रव्य जमिनीत अनेक प्रकारचे काम करायला लागतो .
1) जमीन साफ करणे-जमिनीतील अतिरिक्त क्षार,नको असलेले घटक यांना साफ करण्याचे काम होतें
2)मुळीला नवीन चाल किंवा गती मिळते,मुळी अक्टिव्ह होतें
3) अन्नद्रव्य उचलायला मदत मिळते
4)बॅक्टरीया किवा सेंद्रिय वस्तुंना अडथळा होत नाही
5)युरिया मध्ये नत्र असले तरी सल्फर सोबत एकत्रित आल्याने अतिरिक्त नत्र वाढत नाही
6)नत्राचा वापर किंवा गरज ही पाहिल्यापासून तर शेवटपर्यंत लागते पिकाला ती गरजही थोडयाफार प्रमाणात भागते
7)जमिनीचा ph कॉन्ट्रोल राहतो,तापमान व्यवस्थित राहते
8) मुळी कायम सशक्त ,जोमदार राहुन वनस्पती शेवटपर्यंत ताण विरहित राहते
9)उत्पनात वाढ होते,उत्पादनाची गुणवत्ता सुधारते
10)सलफुरीक ऍसिड ला उत्तम पर्याय आहे.
यूरिया ला पर्याय म्हणून अमोनियम सल्फेट चा वापर

युरिया हे खत नत्राचा स्रोत म्हणुन सर्वाधिक जास्त प्रमाणात वापरले जाते. ज्या जमिनीचा सामु जास्त आहे आणि जेथे जास्त तापमान आहे अशा जमिनीत युरिया पासुन अमोनियम (NH₄⁺) च्या स्वरुपातील उपलब्ध नत्र पिकास मिळत असतांनाच बहुतांश भाग हा व्होलाटायझेशन मुळे अमोनिया च्या (NH₃) स्वरुपात रुपांतरित होवुन पिकांस उपलब्ध न होता हवेत विरुन जातो. हा प्रकार जमिनीच्या पृष्ठ भागावर टाकलेल्या युरिया च्या बाबतीत जास्त प्रमाणात होतो, आणि युरिया दिल्यानंतर 3 आठवड्यात बहुतांश युरिया हा अशा प्रकारे वाया जातो. तसेच युरिया दिल्यानंतर जमिनीचा पीएच देखिल त्या तेवढ्या भागापुरता वाढतो.

CO(NH₂)₂ (Urea ) + H⁺ + 2H₂O——> 2NH₄⁺ + HCO₃⁻ (Hydrolysis – युरिएज Urease या एन्जाईम मुळे होते)

युरिया चे हायड्रोलिसीस झाल्या नंतर तयार झालेला बायकार्बोनेट (HCO₃⁻) हा जमिनीतील कॅल्शियम सोबत क्रिया होवुन कॅल्शियम कार्बोनेट तयार करते (CaCO₃), तसेच ह्या क्रियेत हायड्रोजन (H⁺) मुक्त होवुन सामु वाढण्यास प्रतिबंध देखिल होतो. त्यामुळे ज्या जमिनीत कॅल्शियम चे प्रमाण जास्त असते अशा जमिनीत युरिया मुळे सामु बदलास अटकाव घातला जातो. मात्र सततच्या युरियाच्या वापराने कॅल्शियम कार्बोनेट चे प्रमाण देखिल वाढते. तरी देखिल ज्या जमिनीचा सामु हा जास्त आहे अशा जमिनीत युरिया दिल्याने युरिया ची उपलब्धता कमी होणे, आणि सामु वाढणे या दोन क्रिया घडतात. ज्यावेळेस जमिनीत पाणी कमी असते तसेच जास्त तापमान असते त्यावेळेस हि क्रिया झपाट्याने होते. ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, अशा जमिनीत अमोनियम सल्फेट चा वापर हा सामु कमी करणे आणि व्होलाटायझेशन कमी करणे यासाठी देखिल फायदेशिर ठरतो. कारण अमोनिमय सल्फेट हे कोणत्याही परिस्थितीत 10 ते 14 टक्के ईतकेच व्होलाटायझेशन होते तर युरिया चे व्होलाटायझेशन हे 20 ते 30 टक्के इतके असते.
योग्यरितीने वापरल्यास अमोनियम सल्फेट हे एक फार चांगले खत आहे. अमोनियम सल्फेट मध्ये 21% अमोनियम स्वरुपातील नायट्रोजनचे प्रमाण आणि 24% सल्फेट म्हणजेच सल्फर आहे. अमोनियम सल्फेटचा प्राथमिक वापर अल्कधर्मी मातीसाठी खत स्वरूपात केला जातो, कारण अल्कधर्मी जमिनीमध्ये मातीचा सामू या खताच्या वापरामुळे कमी करणे शक्य होते. अमोनियम सल्फेट हे पाणी विद्रव्य किटकनाशके, हर्बासाइड्स, आणि बुरशीनासाठी शेती स्प्रे सहाय्यक म्हणून देखील वापरले जाते. तिथे पाणी आणि वनस्पती पेशी या दोन्हीमध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण बांधायला चांगले कार्य करते. तसेच हे अमोनियम सल्फेट हे मिश्र खत असल्यामुळे वनस्पतीला सल्फर (गंधक) अगदी सहजगत्या उपलब्ध होतो. अमोनियम सल्फेटच्या वापरामुळे पानातील हरितद्रव्याची वाढ होते, त्यामुळे वनस्पतीच्या पानाचा रंग गडद हिरवा राखण्यासाठी मदत होते. या खताच्या वापरामुळे जमिनीची संरचना सुधारते व पाणी मुरण्यास मदत होते. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यासाठी अमोनियम सल्फेटचा वापर केला जातो.
धन्यवाद.

1 thought on “नत्र/युरिया केव्हा द्यावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »