अनुदानातील ट्रॅक्टरसाठी १५ लाख शेतकऱ्यांचे अर्ज तर राज्यातील २५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर

0

 शेती मशागतीचा खर्च वाढल्याने आता शासनाच्या अनुदानातील ट्रॅक्टरची मागणी वाढली आहे. तब्बल १५ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी राज्यातील कृषी विभागाकडे अनुदानातील ट्रॅक्टरसाठी अर्ज केले आहेत. पण, शासनाकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्याने २०२३-२४ मध्ये राज्यातील फक्त २५ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे.राज्य सरकारने राज्यातील १५

हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदानातून दिले आहेत. शासनाच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाखांची तर मागासवर्गीय, दिव्यांग, महिला, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वालाख रुपयांची सबसिडी दिली जाते. उर्वरित पैसे हप्त्याने संबंधित ट्रॅक्टर कंपनीला शेतकरी भरतात.

कृषी आयुक्त सुनिल चव्हाण म्हणाले, शेती मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर खरेदीकडे वाढला आहे. भाड्याच्या ट्रॅक्टरला नांगरणीसाठी एकरी बावीसशे रुपये, तर कोळपणी, फणासाठी दीड हजार रुपये मोजावे लागतात. स्वत:चाच ट्रॅक्टर असल्यास तेवढा खर्च होत नाही.  सहाय्य करण्यासाठी  शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. आता ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून अर्जदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे.मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक, मागेल त्याला रोटावेटर अशा अनेक योजनांचा लाभ सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जात आहे. मागच्या वर्षी २५ हजार शेतकऱ्यांना अनुदानातील ट्रॅक्टर दिले असून यंदाही लाभ मिळेल.  एकदा महाडिबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी योजनांच्या लाभासाठी अर्ज केला की, त्याला लाभ मिळेपर्यंत पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »