FASTag ला बाय-बाय, लवकरच सुरु होणार GNSS सिस्टम; टोल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया बदलणार..

0

भारताची ऑटो उद्योगात सतत नवकल्पना होत आहे. आधीच्या पारंपरिक पद्धती आणि नंतर FASTag, पण सरकार आता GNSS तंत्रज्ञानाकडे वळत आहे. FASTag मागे सोडून, सरकार आता GNSS तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल वसुली अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या या तंत्रज्ञानाच्या चाचण्यांमुळे, भारतातील टोल सिस्टममध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

काय आहे GNSS?

GNSS म्हणजे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम(Global Navigation Satellite System), ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जी आपल्या वाहनाला एक वर्चुअल टॅग देते. या टॅगच्या मदतीने आपले वाहन स्वतःच आपले ठिकाण आणि वेळ नोंदवत असते. ही एक अशी तंत्रज्ञान आहे ज्यात उपग्रह वापरून आपल्या वाहनाचे ठिकाण शोधले जाते. या सिस्टममध्ये वाहनात लावण्याचे एक छोटेसे उपकरण असते. जेव्हा आपण टोल रस्त्यावरून जाता तेव्हा हे उपकरण आपल्या वाहनाचे ठिकाण आणि वेळ नोंदवते. नंतर या माहितीच्या आधारे आपल्या खात्यातून ऑटोमॅटिकपणे टोल कापला जातो.याशिवाय, आपल्याला फक्त तेवढाच टोल भरावा लागतो जेवढा आपण रस्त्याचा वापर करतो. यामुळे आपला वेळ आणि पैसे वाचतो.

GNSS ही एक अशी तंत्रज्ञान आहे जी आपल्याला टोल भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद बनवेल. यामुळे आपल्याला टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा लावून थांबावे लागत नाही.

नवीन GNSS प्रणाली देशभर कधीपासून लागू होईल, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सध्या या प्रणालीची चाचणी कर्नाटक आणि हरयाणातील काही महामार्गांवर सुरू आहे.कर्नाटकातील बंगळुरू-म्हैसूर आणि हरयाणातील पानिपत- हिसार या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर या प्रणालीची चाचणी सुरू आहे. सरकारकडून या प्रणालीला हिरवा झेंडा मिळताच, आपल्याला टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा लावून थांबावे लागणार नाही.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Translate »