चांदवड तालुक्यात गारांचा पाऊस. . .
(दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे) संध्याकाळी पाच वाजता चांदवड तालुक्यातील दिघवद उर्धुळ हिवरखेडे पन्हाळे आदि गावात जोरदार वारे पाउस आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली तालुक्यातील पन्हाळे येथे गारांचा खच पडल्याने काढणीला आलेला कांदा गहू हरभरा व कांदा बियाणे साठी लावलेले डोंगळे तशेंच भाजी पाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त काही ठिकाणी कापलेले कांदा व गहू गारांनी झोडपले गेले तर उद्या लग्नाची तिथी असल्याने नवरदेवाची पावसात भिजत लग्ननांचया ठिकाणी जावें लागलें त्यामुळे हळदीचा कार्यक्रम प्रसंगी उशिरझाले पन्हाळे येथे गारांचा पाऊस झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
आधीच कांद्याला भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे आणि आता तर गारांच्या पावसाने शेतकऱ्यांचे तोंडावरच पाणी पळाले आहे. तरी, शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी समाज माध्यमे तसेच शेतकऱ्यांकडून होत आहे.


